

ठाकरे गटाचाही समाचार
यावेळी फडणवीस यांनी ठाकरेंवरही निशाणा साधला. “नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा त्यांना अधिकारच नाही. जे मोदींचे फोटो लावून निवडून आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी विचारही सोडला, युती सोडली, पक्षही सोडला ते कोणत्या नाकाने नैतिकता सांगतात, ते मला समजतच नाही. निकाल त्यांच्या बाजूने आला, असे ते म्हणत असतील तर त्यांनी ढोल बडवावेत” असा सल्लाही त्यांनी दिला.अध्यक्ष दबावात येणार नाहीत
विधानसभेच्या अध्यक्षांनी अपात्रता प्रकरणावर १५ दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून सुरु आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, न्यायालयाने या संदर्भातील सर्व अधिकार अध्यक्षांना दिले आहेत. हा अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. ते मुक्त आणि न्याय्य अशा प्रकारच्या न्यायप्रक्रियेत बसत नाही. अध्यक्ष कोणत्याही दबावाला बळी पडतील, असे वाटत नाही. ते स्वतः वकील आहेत. त्यामुळे कायद्यानुसारच सुनावणी करून निर्णय घेतील, असे फडणवीस म्हणाले.