

२०१७ ला उस्मानाबाद येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी लढविली होती. त्यात त्यांना अपयश आले होते. त्यानंतर या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून ते दूरच राहले. पुढे २०२३ मध्ये गुरुकुंज येथे झालेल्या शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या डॉ.सानप यांनी स्वबळावर वाटचाल करीत साहित्य विश्वात नाव कमावले. वर्धेतील गो.से.वाणिज्य महाविद्यालय मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी सेवा दिली. निवृत्ती नंतर ते नागपूरला वास्तव्यास गेले. तिथेच त्यांनी काही काळ लेखन केले. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वात शोककळा पसरली आहे.