
भंडारा BHNDARA २० ऑगस्ट : जिल्ह्यात शनिवार सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. तर याचा फटका मिरची पिकांना बसला आहे. भंडारा तालुक्यातील गुंजेपार Gunjepar in Bhandara Taluka येथिल अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे लागवड केलेल्या मिरची पिक खराब होण्याच्या मार्गावर असून परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा