ही कॅबिनेट मिटींग आहे की मंत्र्यांची पिकनिक? विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल

0
88

नागपूर : विजय वडेट्टीवार यांनी बोलताना सरकारवर निशाण साधला.  “सरकारने जनाची नाही तर मनाची लाज बाळगली पाहिजे. १७ तारखेला होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मंत्री मराठवाड्यात पर्यटनासाठी येत आहेत का असा प्रश्न आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये व्यवस्थापन करणारं हे पहिलं सरकार आहे. सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यात होत आहेत. सरासरी प्रत्येक जिल्ह्यात मागच्या ऑगस्टमध्ये १००- सव्वाशे आत्महत्या झाल्या आहेत. शेतकरी त्रस्त आहे. ९६ तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत. मराठवाडा दुष्काळाच्या छायेत असातना फाईव्ह स्टार व्यवस्था करून कॅबिनेट बैठक घेण्याची गरज का पडली हा खरा प्रश्न आहे.”

 

काय आहे आरोप?

 

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करून म्हटलं होतं की, योजना शेतकऱ्यांची, लाभार्थी यादी भाजपा मंत्र्यांची, किसान संपदा योजनेअंतर्गत केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने कृषी प्रक्रिया क्लस्टर प्रकल्पांना सबसिडी दिली आहे. ह्यात मुख्य लाभार्थी आहे ते भाजप नेते आणि मंत्री विजय गावित यांची मुलगी. सुप्रिया गावित यांच्या “रेवा तापी औद्योगिक विकास” कंपनीला दहा कोटीची सबसिडी मिळाली आहे. भाजपा नेते आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांच्या पत्नीच्या कंपनीला देखील अशीच सबसिडी नुकतीच मिळाली आहे. किसान संपदा योजना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी आहे. योजनेचा लाभ मात्र भाजपा नेते घेत आहे. योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढले नाही, भाजपात भरती झालेल्या नेत्यांचे उत्पन्न कोटींनी वाढले हे मात्र खरे आहे असा आरोप त्यांनी केला.

 

“कॅबिनेटच्या नावाखाली मौजमस्ती करायला तर हे सरकार येत नाहीये ना असा विषय चर्चेला आला आहे. यापूर्वी कॅबिनेटच्या बैठका झाल्या, पण मंत्री कधीही फाईव्ह स्टारमध्ये थांबले नव्हते. फाईव्ह स्टारचा पाहुणचार घेतला नव्हता. विश्वासराव देशमुख, अशोक चव्हाण किंवा यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या तेव्हा गेस्ट हाऊसमध्ये थांबून बैठका घेतल्या. हाजोर थाळ्यांची जेवणाची प्लेट, पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत. सरकाराल जनाची नाही पण मनाची लाज वाटत असेल तर जरा तरी विचार करावा. फडणवीस सरकारने २०१६ ला दिलेलं पॅकेज मराठावाड्यातील जनता विसरली नाही. ५० हजार कोटीच्या पॅकेजचं काय झालं? मराठवाड्यातील जनता अशा नालायक सरकारला माफ करणार नाही, असंही वडेट्टीवार म्हणाले.

सरकारने जनाची नाहीतर मनाची लाज बाळगली पाहिजे

 

“राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी. विश्रांतीला फाईव स्टार हॉटेल, जेवायला १५०० रुपयांची थाळी… दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन?”, असंही ते म्हणाले.

मंत्र्यांच्या खर्चाची यादीच केली जाहीर

फाईव स्टार हॉटेल 30 रूम बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री)
ताज हॉटेल 40 रूम बुक (सर्व सचिव)
अमरप्रीत हॉटेल 70 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी)
अजंता अॅम्बेसेडर 40 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी)
महसूल प्रबोधिनी 100 रूम (सुरक्षा रक्षक, वाहनचालक)
पाटीदार भवन 100 (सुरक्षा रक्षक, वाहनचालक)
वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे – 20 ( इतर अधिकारी)
एकूण 150 गाड्या नाशिक येथून भाड्याने घेण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद शहरातील देखील 150 गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत 1 हजार ते दीड हजार असणार आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा