विश्वकर्मा योजना ओबीसी,बारा बलुतेदारांसाठी संजीवनी -संजय गाते

0

-13 ऑक्टोबरला भाजप ओबीसी जागर यात्रेचा समारोप, पोहरादेवीत ओबीसींचा कुंभमेळा नागपूर -भाजप ओबीसी जागर यात्रेच्या माध्यमातून 1950 ते 1992 चा काँग्रेसचा ओबीसी संदर्भातील इतिहास ओबीसी जनतेपुढे मांडण्याचे काम केले जात आहे. आजवर काँग्रेसने ओबीसी समाजाची केवळ दिशाभूल केली,उलट भाजपने पंतप्रधान नर्रेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीला खऱ्या अर्थाने न्याय दिला. केंद्र सरकारची विश्वकर्मा योजना ओबीसी,बारा बलुतेदारांसाठी संजीवनी ठरणार आहे. भाजप ओबीसींचा ओबीसी भाजपचा हेच या यात्रेचे सूत्र आहे असे प्रतिपादन भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी केले. ओबीसींना न्याय देण्याची इच्छाशक्ती केवळ भाजपात असल्यावर भर दिला. भाजप ओबीसी जागर यात्रा वर्धा, नागपूर,अमरावती, अकोला, शेगाव बुलढाणामार्गे आज जळगाव जामोद येथे पोहचली. यावेळी संजय गाते ‘शंखनाद” शी बोलत होते. संजय गाते म्हणाले, खऱ्या अर्थाने 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यांनी ओबीसी उत्कर्षाची सुरुवात केली. मेडीकलच्या विद्यार्थ्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळाला.

देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून ओबीसी मंत्रालय सुरू केले. या विभागाचे पहिले मंत्री म्हणून संजय कुंटे यांना काम करण्याची संधी मिळाली. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील पारडी ते पोहरादेवी ही जनजागृती यात्रा निघाली असून ओबीसी राजाची जनजागृती करण्याचे काम भाजप करत आहे. काँग्रेसवाले केवळ ओबीसी समाजाच्या डोळ्यात धुळफेक करीत आहेत.

देशाला ओबीसी प्रधानमंत्री देखील काँग्रेसने दिला नाही. पारडसिंगा,गुरुकुंज मोझरी, ऋणमोचन येथे आशीर्वाद घेतले. आता येत्या 13 ऑक्टोबरला बंजारा समाजाचे आराध्य दैवत पोहरादेवी येथे ओबीसी समाजाचा कुंभमेळा होत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड ,केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्यासह अनेक मान्यवर किमान 50 हजारावर ओबीसी बांधव एकत्रित येतील असा विश्वास संजय गाते यांनी बोलून दाखविला. यावेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी आमदार डॉ आशिष देशमुख, अर्चना डेहनकर, ओबोसी मोर्चा प्रदेश सहसंपर्कप्रमुख रवींद्र चव्हाण आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा