
नागपूर NAGPUR – काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी SHRAD PAWAR शरद पवारांवर टीका केली. कृषी मंत्री म्हणून शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केले नसल्याचा आरोप केला
मुळात 2011 मध्ये सुरेंद्र भोंगळे यांनी नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. त्यात शरद पवार यांचे प्रत्येक पाऊल शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेने असल्याचा उल्लेख स्वतः मोदींनी केला अशी आठवण आज माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी करून दिली आहे.
देशमुख आज माध्यमांशी बोलताना म्हणाले, शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या संघर्षाची मला जाणीव असून आधारभूत किमतीत शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. शरद पवार हे शेतकऱ्यांचे देवदूत आहेत, असा उल्लेख मोदींनी केला होता. आज निवडणूक समोर आल्याने मोदींनी आपली भूमिका बदलली. भारत देश अन्न धान्यामध्ये स्वयंपूर्ण शरद पवारांच्या निर्णयाने झाला. आजवरची सर्वात मोठी ७१ हजार कोटींची कर्जमाफी शरद पवारांच्या निर्णयाने मिळाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आपल्या वक्तव्यात सुधारणा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
खरेतर अजित पवारांनी नरेंद्र मोदी जेव्हा शरद पवार यांचेवर टीका करत होते, तेव्हा तिथून उठून जायला हवं होत किंवा त्यांना माहिती देऊन सुधारणा करायला हवी होती. अजित पवारांनी माहिती दिली असती तर निश्चितच मोदींनी चूक दुरुस्ती केली असती.अजित पवारांनी आताही मोदींना माहिती दिली, तर पुढील सभेत अशी टीका शरद पवारांवर मोदी करणार नाहीत. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी १७ लोकांना अटक केली आहे. मात्र,अटक करायला इतका वेळ का लागतो आहे? माजी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना माझा सवाल आहे की, ९ महिने तो रुग्णालयात ऍडमिट होता. याची माहिती फडणवीसांना नव्हती का?
यासंदर्भात वरून कोणाचा आदेश ससूनच्या डीन ला आला होता? असा सवाल अनिल देशमुख यांनी उपस्थित केला.