
जालना – मराठा आरक्षणावर काहीही न बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाजी मारली असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. पंतप्रधानांना आरक्षणावर बोलायचं नव्हतं तर त्यांनी राज्यात यायलाच नव्हतं.मग, आले तर बोलायला पाहिजे होतं. कारण ते गोर गरिबांचे पंतप्रधान आहेत असं ते बोलतात. मात्र आता मराठ्यांना समजलं की त्यांचं कुणीच नाहीये म्हणून. त्यामुळं आता मराठे यांना वठणीवर आणतील आणि आरक्षण घेतीलच असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा