शिवसेना ही नाटक कंपनी
मुंबई
मुंबई महापालिका निवडणूक आल्याने गुजराती समाजाची आठवण झाली तसेच औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने त्यांना संभाजी महाराजांची आठवण होऊ लागली असून शिवसेना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिवसेना ही नाटक कंपनी असल्याचे म्हणत त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. औरंगाबादच्या नामांतराचा विषय म्हणजे शिवसेनेचे नाटक असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले, सेना फक्त प्रस्ताव पाठवते, भूमिका घेत नाही. ही सगळी नाटक कंपनी आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष सर्व गोष्टी ठरवून करतात. औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना, काँग्रेसचे राजकारण सुरू असल्याचे ते म्हणाले. ह्यशिवसेनेने आता औरंगाबादचे संभाजी नगर करा, असे म्हणायचे. म्हणजे त्यांना वाटते त्यांचे मतदार खूश होतील. काँग्रेसने ते करू नका अशी भूमिका घ्यायची. म्हणजे त्यांना वाटते, त्यांचे मतदार खूश होती. निवडणुका आल्यामुळे ही नुराकुस्ती सुरू झाली आहे. दोन्ही पक्ष निव्वळ नाटक करत आहेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
औरंगाबादमधील रस्त्याच्या कामासाठी मी मुख्यमंत्री असतान पैसे दिले. पण महानगरपालिकेनं ते पैसे वेळेत खर्च केले नाहीत. मी १00 कोटी देतो असे सांगितले होतं. पण त्यांना आधीचेच पैसे खर्च करता आले नाहीत. औरंगाबादमध्ये इतकी वषर्ं सत्ता असूनही कुठलेही महत्त्वाचे काम न करता आल्याने आता नामांतराची भाषा सुरू झाली आहे. शिवसेनेकडून केवळ पत्रं पाठवली जातात. बाकी कुठलीही कार्यवाही ते करत नाहीत. केवळ निवडणुका आल्यानंतर त्यांना या गोष्टी का आठवतात, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.