चारा, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा, सरकारच्या सूचना

0
40

मुंबई- राज्यात अनेक भागात अपुरा पाऊस पडला असल्याने कृषी, महसूल व संबंधित विभागांनी चारा, वैरण आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागांना दिल्या आहेत. यावर्षी आतापर्यंत सरसरीच्या ८९ टक्केच पाऊस झाला आहे. तर मागील वर्षी सरासरीच्या १२२.८ टक्के पाऊस झाला होता. पुढील काही दिवसात हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र, तरीही नियोजन करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.
कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत पेरण्यांची माहिती दिली. राज्यात 139.35 लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 91 टक्के पेरण्या झाल्या आहेत. 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेले 6 जिल्हे असून, 75 ते 100 टक्के पाऊस झालेले 13 जिल्हे आणि 50 ते 75 टक्के पाऊस झालेले 15 जिल्हे आहेत. राज्यात 25 ते 50 टक्के पाऊस झालेले 13 तालुके आहेत. सध्या राज्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात 61.90 टक्के पाणी साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास 80.90 टक्के पाणी साठा होता. नागपूर विभागातील धरणांमध्ये सध्या 70.47 टक्के, अमरावती 66.57 टक्के, औरंगाबाद 31.65 टक्के, नाशिक 57.16 टक्के, पुणे 68.23 टक्के आणि कोकण 87.25 टक्के अशी पाणी साठ्याची स्थिती असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा