ओबीसी आंदोलन सुरूच राहणार ! -संविधान चौकातून निघाला महामोर्चा

0
14

नागपूर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र सरसकट देण्यात येऊ नये या दोन प्रमुख मागण्यांबाबत राज्य सरकारने मुंबईत बैठकीला बोलावून लेखी आश्वासन दिल्याशिवाय आता माघार नाही असा इशारा आज ओबीसी महासंघाने सरकारला दिला आहे. मराठा आंदोलन सांगता झाल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतरही ओबीसी महासंघाने आपला लढा कायम ठेवला आहे. राज्यभरात ओबीसी आंदोलन, मोर्चे सुरू आहेत हे विशेष. सोमवारी संविधान चौक येथून ओबीसी महामोर्चा निघाला. कडक पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा अडविण्यात आल्यानंतर अनेक नेत्यांची, कृती समिती पदाधिकारी भाषणे झाली. यानंतर काही नेत्यांनी तूर्तास आठवडभरासाठी हे आंदोलन स्थगित करीत असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, ओबीसी महासंघाने आंदोलन संपले नसल्याचे जाहीर केले. मोर्चाचे नेतृत्व ओबीसी महासंघ अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, सुरेश गुडधे पाटील, पुरुषोत्तम शहाणे,राजेश काकडे, अवंतिका लेकुरवाळे आदी कुणबी ओबीसी महासंघ कृती समितीचे पदाधिकारी यांनी केले. मोर्चा समारोप प्रसंगी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,माजी मंत्री अनिल देशमुख, सुनील केदार, परिणय फुके, युवा नेते सलील देशमुख, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दूनेश्वर पेठे, भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार अशोक धवड,आशिष देशमुख,ईश्वर बालबुधे, आदी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यात सहभागी झाले .

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा