विश्वचषक अखेर ऑस्ट्रेलियाचा ! -241 धावांचे भारताचे आव्हान लिलया गाठले

0

नागपूर – आज रविवारी झालेला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना अखेर ऑस्ट्रेलियाने जिंकला. विश्वचषकाचा दावेदार असलेल्या भारतीय संघाने नाणेफेकिसोबतच महत्वाचा सामनाही गमावल्याने भारतीय क्रिकेट रसिकांची घोर निराशा झाली. 47 षटकात 4 बाद 241 धावा करीत ऑस्ट्रेलियन संघ विश्वविजेता ठरला. भारतीय संघाने सर्व साखळी सामन्यात दमदार विजय मिळवित भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र,आज या स्पर्धेत अंतिम सामन्यात प्रथमच सर्वबाद केवळ 240 धावा केल्याने चाहत्यांची घोर निराशा झाली. ऑस्ट्रेलियन संघाने हे 241 धावांचे लक्ष्य लिलया गाठत भारतीय संघाच्या विश्वचषक जिंकण्याच्या अपेक्षा धुळीस मिळविल्या. पहिल्या तासात भारतीय गोलंदाजांवर या सामन्याची, भारताची मदार अवलंबून असल्याचे व भारत नक्की जिंकेल असा समीक्षकांनी वर्तविलेला अंदाजही या खेळपट्टीवर खोटा ठरला. पहिल्या पॉवरप्लेमध्ये 3 गडी बाद होऊनही हेड आणि लाबुशेन यांच्या संयमी भागिदारीने भारताला विजयापासून पर्यायाने विश्वविजेतेपदापासून दूर नेले. के.एल.राहुलच्या 64 धावा,कर्णधार रोहित शर्माने झटपट केलेल्या 48 धावांची खेळी निरर्थक ठरली. इतर फलंदाजही अपयशी ठरले विराट कोहलीचे लवकर बाद होणे, सुर्यकुमार यादवला शेवटच्या षटकात साथीदार न मिळणे आणि महत्वाचे म्हणजे अचूक गोलंदाजी आणि किमान 40 धावा रोखणारे चपळ क्षेत्ररक्षण, रोहित शर्माचा अप्रतिम झेल ही ऑस्ट्रेलियन संघासाठी या विजयात जमेची बाजू ठरली. उपांत्य सामन्यात 7 बळी घेत न्यूझीलंडचे कंबरडे मोडणारा मोहम्मद शमी यासोबतच जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज या फायनलमध्ये निष्प्रभ ठरले. भारतीय संघाची ढेपाळलेली फलंदाजी यात महत्वाची ठरली. माजी विश्वविजेता भारत आणि ऑस्ट्रेलिया विजेतेपदासाठी झुंजणार म्हटल्यावर देशभरात भारतीय संघासाठी सकाळपासून चाहत्यांनी होमहवन, पूजा अर्चना केली. कुठे ढोलताशा वाजवत तर कुठे मोठ्या स्क्रीनवर सामन्याचा थरार अनुभवत चाहत्यांनी आपापल्या परीने जल्लोष साजरा केला. भारताने न्यूझीलंडचा पराभव करीत तर उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या टप्प्यात संघर्ष करीत दक्षिण आफ्रिकेचा ३ गडी राखून पराभव करुन फायनलमध्ये प्रवेश मिळविला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी फायनलमध्ये विश्वविजेतेपदासाठी यजमान भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ,अमित शहा यांच्यासह देशविदेशातील सेलिब्रिटी उपस्थित होते. ही लढत भारताच्या दृष्टीने उत्कंठावर्धक होईल अशी अपेक्षा होती पण ती एकतर्फीच ठरली. जलदगती मो शमी,रवींद्र जडेजाच्या फिरकीवर भारताची भिस्त होती ती आशा देखील फोल ठरली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा