
नागपूर: ग्राहक हक्क संरक्षण आणि संवर्धनासाठी दीर्घ काळ कार्यरत असलेल्या ॲड. गौरी दिलीप चांद्रायण (वय ६६) यांचे निधन झाले. महावितरणच्या सल्लागार (ग्राहक विषयक) म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासोबतच, ग्राहक चळवळीतील एक अभ्यासू आणि आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.
ॲड. गौरी चांद्रायण यांनी नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात त्यांनी न्यायिक सदस्य म्हणून प्रभावी काम केले. शहरी विभागाच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या (CGRF) व रेल्वे डीआरयूसीसीत त्या सक्रिय सदस्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती दिलीप चांद्रायण, मुले डॉ. कपिल व अंबरीश चांद्रायण, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Related posts:
विदर्भ साहित्य संघात ग.त्र्यं. माडखोलकर स्मृती व्याख्यानमाला १९ एप्रिल रोजी
April 18, 2026Artical Blog
शिक्षण संस्थानी शिक्षण विभागाचे ‘समायोजन’ आदेश स्वीकारू नये, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळा...
April 18, 2026Artical Blog
वि. सा. संघाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आर्थिक सहकार्य करा...
April 18, 2026MAHARASHTRA



















