उपराजधानीत अतिवृष्टीमुळे नुकसान

0

 

-दहा हजार घरांचे नुकसान,घरगुती साहित्य भिजले

नागपूर -नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे , घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून घरातील चिखल काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्यात येईल, तसेच नुकसानी संदर्भात तात्काळ पूर्ण करून मदत देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. काही ठिकाणी संतापलेल्या नागरिकांशीही सामना करावा लागला.
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चार तासात जोरदार पावसामुळे अंबाझरी परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे अन्नधान्य सह इतर साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या नुकसानीची पाहणी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केली.डागा लेआउट , कार्पोरेशन कॉलनी,शंकर नगर सह इतर वस्त्यांना भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला.तसेच घरात चिखलामुळे झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली.
सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले असून या नुकसानी संदर्भात नागरिकांना संपूर्ण मदत करण्यात येईल ,अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. झालेल्या नुकसानी संदर्भात नागरिकांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या, जास्तीत जास्त मदत करण्याची ग्वाही यावेळी फडणवीस यांनी दिली.
नाग नदीला आलेल्या पुराची तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटनेची संपूर्ण माहिती यावेळी त्यांनी घेतली . तासात 109 मिलिमीटर एवढा पाऊस झाला असून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नदीचे पात्र कमी पडल्यामुळे इतर वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यापुढे अशी घटना घडणार नाही याची दखल घेण्यात आली असून पाण्याचा प्रवाह कुठेही थांबणार नाही, या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येईल. भविष्यात अशा घटना टाळण्यास येतील असेही नागरिकांना त्यांनी सांगितले.
पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे सर्वत्र चिखल साचला आहे. तसेच घरातील चिखल काढण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्वांना क्लोरीनच्या गोळ्या देण्यात येत आहेत.जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणीस यांनी दिलेत.
उपमुख्यमंत्र्यांनी सकाळी अंबाझरी तलाव, नाग नदी तसेच कार्पोरेशन कॉलनी डागा लेआउट शंकर नगर आधी सर्व भागांना भेट देऊन पाहणी केली यावेळी माजी महापौर संदीप जोशी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते