Home Top News 100 जणांना जेवणातून विषबाधा; या गावात घडली घटना

100 जणांना जेवणातून विषबाधा; या गावात घडली घटना

0

 

चंद्रपूर (Chandrapur) – चंद्रपूर जिल्ह्यात एका धार्मिक कार्यक्रमानंतरच्या सामूहिक भोजनातून 100 नागरिकांना विषबाधा झाल्याचे उघड झाले आहे. यातील एक वृद्ध व्यक्ती रामप्रेक्ष यादव दगावला आहे.

चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हा मृत्यू नोंदविला गेलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या माजरी गावात (Majri village)एका धार्मिक कार्यक्रमानंतर मंदिरात भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

भोजनानंतर सहभागी 100 लोकांना रात्री उशिरा मळमळ- उलटीचा त्रास झाल्यानंतर आसपासच्या वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड रुग्णालय, वरोरा उपजिल्हा रुग्णालय, स्थानिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक याने भेट दिली आहे. सध्या पोलीस व आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.