नागपूर जिल्ह्यातील बसेसची संख्या चारशेवर -बावनकुळे यांनी मागितला प्रस्ताव

0

नागपूर जिल्ह्यात ६०० बसेसची संख्या मागील वर्षांत कमी होऊन ४०० झाली असल्याचे वास्तव भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीतून समोर आले. बससेची संख्या वाढविण्यासाठी प्रस्ताव द्या असे आवाहन यावेळी करण्यात आले. काटोल आगाराच्या बसगाड्यांची संख्या ७५ हून कमी होऊन ५५ झाली आहे, यामुळे नियमित ४९ फेऱ्या पूर्ण होत नसल्याचे सांगून ७५ बसेसचा कोटा पूर्ण करण्याची गरज आहे. तर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी बसगाड्यांची संख्या वाढवून पूर्ववत करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. हा प्रस्ताव सादर केल्यावर त्याचा पाठपुरावा करू असे आश्वासन यावेळी बावनकुळे यांनी दिले.
ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाने नियमित बस सेवा सुरू करण्याच्या सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य परिवहन विभाग अधिकाऱ्यांना दिल्या.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नागपूर विभागीय विभागीय नियंत्रक प्रल्हाद घुले, उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे, विभागीय वाहतूक अधिकारी स्वाती तांबे, नीलेश धारगावे, संतोष शेगोकार व जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापकांकडून आढावा घेतला. लवकरच शाळा सुरू होणार असून ग्रामीण भागातून शिक्षणासाठी मोठ्या संख्येत विद्यार्थी मोठ्या गावांत, तालुक्याच्या ठिकाणी व नागपूर शहरात येतात. मात्र शाळा-महाविद्यालयांच्या वेळेवर अनेक मार्गावर बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो ही बाब निदर्शनास आणून दिली. .