मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत व्यवस्था उभारणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

0

मुंबई : वाघ आणि बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना जंगल कमी वेगाने वाढत आहे. मानव वन्यजीव संघर्ष (Man-Animal Conflict) टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापर करून व्यवस्था उभी करणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Forest Minister Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले.
सदस्य जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुक्यात बिबट्यांमुळे सर्वसामान्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, विभागीय, वनपरिक्षेत्र व परिमंडळ स्तरावर वन्यजीव बचाव पथकाची स्थापना करण्यात आली. बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून गस्ती पथकाद्वारे नियमित गस्त घालणे तसेच जनजागृतीद्वारे प्रबोधन करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अनिल बाबर, संजय कुटे यांनी सहभाग घेतला.