Home Top News शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचलेलीच नाही – अजित पवार

शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचलेलीच नाही – अजित पवार

0

अमरावती – विधानसभेचे विरोधी पक्षनेते आजितदादा पवार अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी राज्य सरकारने दिलेली मदत शेतकऱ्यांपर्यत पोहचलीच नाही असा आरोप केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातींवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांचा पहिल्या जाहिरातीत फोटो नव्हता. त्यामुळे पुन्हा काउंटर जाहिरात दिली. पहिल्या जाहिरातीत भाजप नेते दुखावले असल्याची खदखद होती. सरकारने राज्यातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवावेत,
नोकर भरती करावी 75 हजार नोकर भरती करतो म्हणाले पण अद्याप केली नाही, शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नाही. महाविकास आघाडी एकजूट राहावी यासाठी सातत्याने प्रयत्न करू,पावसाने पश्चिम विदर्भात ओल दिली आहे. धरणात पाणीसाठा कमी आहे,दुबार पेरणी करावी लागत आहेत. खतांच्या किमती वाढल्या आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.