वर्धा : बोगस बियाण्याचे प्रकरण हे वर्धा जिल्ह्यातूनच उघडकीस आले आहे. यामागे फार मोठे रॅकेट असल्याचे उघडकीस आलेले आहे. त्यामध्ये गुजरात,राजस्थान, मध्यप्रदेश जुळले असल्याचे रॅकेट सुद्धा समोर आले आहे. या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सरकारने सुद्धा लक्ष दिले असून या संदर्भात लोकसभेत प्रश्न मांडून त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करणार असल्याचे खासदार रामदास तडस यांनी सांगितले.
















