बीड : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 20 जानेवारीला मुंबईत जाऊन आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा केली. संपूर्ण समाजबांधवांनी 20 तारखेला मुंबईच्या दिशेने निघायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. (Maratha Reservation) जे आमदार आणि खासदार मराठा आंदोलनासाठी साथ देत नाही, त्यांना यापुढे दारातही उभे करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
बीड येथील जाहीरसभेत जरांगे यांनी मुंबईतील उपोषणाची घोषणा केली. ते म्हणाले, राज्य सरकार वेळकाढूपणा करत मराठ्यांची फसवणूक करते आहे. आम्ही तरी किती दिवस दम काढणार? मराठ्यांना विचारल्याशिवाय मी काही करणार नाही. २० जानेवारीपासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. मराठा आंदोलनात जाळपोळ करू नका, जो जाळपोळ करेल तो आपला नाही, असे जरांगे म्हणाले.
Related posts:
आदिमांनी सामाजिक शक्ती उभी करावी- आदिम नेत्या ॲड. नंदा पराते
May 10, 2026Artical Blog
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त, १७ आणि १८ मे रोजी 'जलसंवाद' आणि 'ज...
May 10, 2026Artical Blog
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन व सर्वोत्कृष्ट परिचारिका/ट्यूटर पुरस्कार सोहळा २०२६
May 10, 2026Artical Blog














