नागपूर : वायूप्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत देशव्यापी पावले उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून 15 वर्षांपेक्षा अधिक जुनी शासकीय वाहने स्क्रॅप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2 दिवसांपूर्वीच या धोरणासंदर्भात आढावा घेतला. 15 वर्षे जुन्या खासगी वाहनांची फिटनेस तपासणी केली जाईल. स्थिती योग नसल्यास ही वाहने देखील स्क्रॅप केली जाणार असल्याचे आज केंद्रीय पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. राहुल गांधी देशद्रोही, केला घणाघात केंद्रीय अर्थसंकल्पात विदर्भासह महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर विकासाला चालना मिळणार आहे. यासोबतच पर्यावरणाचा समतोल साधण्याचेही कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसने देशाला लुटण्याचे काम केले आहे. त्यामुळे नोटीसचे येणे- जाणे आता सुरूच राहणार आहे. जे केले त्याची फळे भोगावेच लागणार आहेत. कुणालाही सोडले जाणार नाही. सोनीया काँग्रेसचे युवराज असलेले राहुल गांधी यांनी लोकशाहीच्या विचारांवर घाला घातला आहे. त्यांना देशद्रोह्यांच्या पंगतीत बसविले तरी ते कमीच ठरेल, असे टीकास्त्र अश्विनी कुमार चौबे यांनी आज डागले. आज ईडी, आयटी, पोलिसांच्या नावाने गळे काडून ओरड सुरू आहे. पण, यंत्रणा आपले काम करीत आहे. या सर्व स्वायत्त संस्था आहेत. त्यांच्यावर सरकारचा कुठलाही दबाव नसल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. सुरेश भट सभागृहात आयोजित होमिओपॅथी समिटच्या निमित्ताने ते नागपुरात आले होते. चौबे म्हणाले की, 9 वर्षांपासून देशात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस ही लोकांची चळवळ होती. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे रूप बदलले. ही मंडळी भारताला सामर्थ्यवान, विश्वगुरू झालेले कदापि पाहू शकत नाही. सोनीया काँग्रेसच्या युवराजाने विदेशात जाऊन इथल्या लोकशाहीवर बोलून भारताची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले आहे. याच युवराजांचे देशव्यापी अभियान ‘टायटाय फिस’ झाले. लोकांनी बहिष्कार टाकला. यामुळे त्यांना बाहेर जाऊन बोलावे लागले. अशा या युवराजाला भारतीय जनता कदापि सहन करणार नाही. त्यांना देशद्रोही म्हणूनच ओळखले जाईल.