नागपूर. खनीज धोरण तयार करताना समग्र विचार करण्यात आलेला आहे. लवकरच मुख्यमंत्री याची घोषणा करतील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधीवरील चर्चेच्या उत्तरात दिली. वीजेचे दर जास्त असल्यामुळे राज्यातील 36 स्टिल उद्योग बंद झाले असून 10 उद्योग गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ राज्यात स्थलांतरीत झाल्याच्या प्रश्नाकडे नरेंद्र भोंडेकर यांनी लक्ष वेधले होते. वीज दरात सवलत देण्यात यावी अशी मागणी भोंडेकर यांनी लक्षवेधीतून केली होती. खनिज धोरणाचा मसुदा जवळ जवळ अंतिम टप्प्यात आहे. लवकरच मुख्यमंत्री त्याची घोषणा करतील असे फडणवीस यांनी सांगितले. या धोरणात खाणीजवळच्या क्षेत्रात खनिजावर आधारित उद्योगांची इकोसिस्टिम तयार करण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योग बंद पडले तसेच इतर राज्यात गेले ही वस्तुस्थिती आहे. मात्र हे उद्योग 1999 पासून बंद पडत असून स्थलांतरीत झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधीवरील चर्चेच्या उत्तरात दिली. वीजेचे दर राज्यात प्रति यूनिट 8.48 रूपये आहे. छत्तीसगढ येथे 6.95 पैसे दर आहे. असे असले तरी राज्यात अनेक सवलती दिल्या जातात. शेतकऱ्यांना वीज देताना लॅण्डींग काॅस्ट 7 रूपये पडते. त्यांना आपण एक ते दीड रूपयांना वीज देतो. उर्वरीत भार उद्योगांवर पडतो. विदर्भ व मराठवाड्याकरीता वीज सवलत योजना आणली होती. परंतु मागील सरकारने त्यात काही बदल केले.
दिलेल्या सबसिडीत नव्याने बदल करून उद्योग पुरक धोरण आखता येईल काय याविषयी विचार सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. गडचिरोलीत खनीज उद्योग आल्यामुळे एटापल्लीत वर्षभरात 1600 दुचाकी विकत घेतल्या.
किशोर जोरगेवार यांनी 200 यूनिट वीज वापर मोफत देण्याची मागणी केली. विदर्भातील खाण कामातील खनीजे छत्तीसगढला जात आहे. गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर येथे पहिल्यांदा कच्चा माल द्यावा लागेल असे मॅगनीज और इंडियाला सांगितल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
भास्कर जाधव यांनी विदर्भाप्रमाणे कोकणात खनीजावर आधारित उद्योगाची स्थापना करणार का, असा प्रश्न विचारला. आरजीपीपीएल ही 1970 मेगावॅट पॉवर देणारी कंपनी बंद पडली आहे. रशिया युक्रेनमुळे क्रायसिसमुळे संपूर्ण जगातच गॅसचा तुटवडा आहे. गॅसची उपलब्धता नसल्याने नॅचरल गॅसवर कन्व्हर्ट करता येऊ शकते काय हे तपासून पाहु असे फडणवीस यांनी सांगितले. अमरावती जिल्ह्यातील फिनले मील सुरू कशी करता येईल याविषयी प्रयत्न करू असे बच्चू कडू यांच्या प्रश्नावर सांगितले.