
(Sangamner)संगमनेर : तालुक्यात अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता तातडीने पंचनामे करा अशी मागणी कोठे खुर्दे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. संगमनेरच्या कोठे खुर्द येथील शेतकरी (Kishore Dokre)किशोर ढोकरे यांच्या गाईच्या गोठ्याची पत्रे व अन्य साहित्य उडून एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. व अन्य शेतकऱ्यांच्या पिकांची व घरांचे देखील नुकसान या परिसरात झाले आहे.