
नागपूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनी जवळपास ४ हजार किमी प्रवास करत जात ,धर्मातील दरी मिटवल्या. दुसरीकडे मागच्या सहा महिन्यात राज्यात सात दंगली झाल्या. याला जबाबदार कोण हे कळेलच. काँग्रेसच्या पदयात्रेतून माणसाला जोडू,लोकांच्या वेदना जाणू.
आज सरकारमुळे कोणताच घटक खुश नाही. काँग्रेसला Congress बळकटी या यात्रेने मिळेलच शिवाय माणसाला माणूस म्हणून जोडेल. मी आज चार वाजता जालन्याला निघेल.जालना येथील घटनेची मी तिथे जाऊन माहिती घेईल.हा लाठीचार्ज सरकार पुरस्कृत आणि गृहविभाग पुरस्कृत आहे. मराठा समाजाचा ठिकाठीकाणी उद्रेक दिसतो.केवळ मतासाठी यांची आरक्षणाची बनवाबनवी सुरू होती.ती चूक आता महागात पडेल असे चित्र दिसते. Vijay Vadettiwar
– गृह विभाग खोटे बोलतो की, अगोदर पोलिससावर दगडफेक झाली. पोलीस जखमी झाल्याचा आकडा वाढवून सांगितला जातो.
– भिडेंचा विषय होता त्यावेळी त्यांचे समर्थन आणि पोलीसावर कारवाई.आता मराठा समाजाला दोषी धरले जात आहे.
– मराठवाडा यात्रा एक आठवडा पुढे ढकलली असे स्पष्ट करीत मराठा समाजाला शांततेचे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.
मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण देण्यापूर्वी आरक्षण मर्यादा वाढवली पाहिजे.
– या राज्यात ओबीसी नेतृत्व जाणीवपूर्वक संपवले जाते. आता कामठीवाले एक राहिले आहेत. त्यांचा दिवा किती दिवस उजळत राहतो हे पाहतोय असा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अप्रत्यक्ष टोला दिला.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















