वर्धा : वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी यावर्षी शेतामध्ये उन्हाळयात टरबूज लागवड मोठ्या प्रमाणात केली. मात्र बाजारपेठात योग्य दर नसल्या कारणाने कमी पैशात टरबूज विकावे लागत आहे. शेतकऱ्याने शेतामध्ये टरबुजाची लागवड केली आहे.
मात्र त्याला पाहिजे तेवढा मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकरी बांधव त्रस्त आहेत. मार्केटमध्ये सुद्धा खूप कमी खूप कमी दर आहे. त्यामुळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करीत आहे.