मोसंबीसह संत्र्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांसाठी ‘नागपूर ऑरेंज’ ब्रँड तयार व्हावा, नितीन गडकरीं

0

ब्रॅण्डला सर्वात जास्त महत्व आहे. त्यामुळं नागपूरी संत्र्याची (Nagpur Orange) जाहिरात झाली पाहिजे असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी केलं. मोसंबी आणि संत्र्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांसाठी ‘नागपूर ऑरेंज’ नावाचा एक ब्रँड तयार करण्याचा सल्लाही गडकरींनी दिला. नागपुरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनात (Agro Vision Agricultural Exhibition) गडकरी बोलत होते.

शेती क्षेत्रात यश मिळवण्यासाठी जमीन चांगली करणे, कसदार करणे आवश्यक आहे. त्यानंतर दर्जेदार रोपे तयार करणे आणि आपलं उत्पादन वाढवणे हे शेतीतल्या यशाचा एक भाग असल्याचे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. तयार झालेल्या उत्पादनांची चांगली मार्केटिंग करणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी ब्रॅण्डिंग करणे आवश्यक आहे. त्यामुळं संत्रा आणि मोसंबीपासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांसाठी ‘नागपूर ऑरेंज’ नावाची एक ब्रँड तयार करावी असा सल्लाही यावेळी गडकरी यांनी दिला. शेतमाल आधारित उत्पादनाला एक ब्रँड मिळाला तर लोक त्या उत्पादनांचा सहज स्वीकार करतात असेही गडकरी म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा