नागपूर विमानतळावर प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोना काळात दरमहा प्रवाशांची संख्या 30 हजार ते 40 हजारापर्यंत आली होती, ती आता सरासरी 1.80 लाखपर्यंत पोहोचली आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहून मिहान इंडिया लि.चे अधिकारी अत्यंत उत्साहित असून लवकरच प्रवाशांची संख्या 2 लाख दरमहाच्यावर जाण्याचीही त्यांना अपेक्षा आहे. याशिवाय काही नवीन फ्लाइट्स (new flights from nagpur) सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत. कोरोनापूर्वी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळा
वरून प्रवाशांची संख्या दरमहा 2.25-2.50 लाखपर्यंत पोहोचली होती. जाणकारांनी सांगितले की, प्रवाशांच्या संख्येत प्रत्येक महिन्याला वाढ होत आहे. बऱ्याच दिवसांपर्यंत आकडा 1.5 लाखच्या जवळपास अडकला होता, परंतु आता दरमहा 1.80-1.90 लाख प्रवाशांपर्यंत पोहोचला आहे.
सहा हजार प्रवासी दररोज
सध्या दररोज विमानाने बाहेर जाणाऱ्यांची संख्या 3,000 ते 3,100 पर्यंत पोहोचली आहे. तर एवढेच प्रवासी वेगवेगळ्या ठिकाणांवरून नागपुरातही (Nagpur) येत आहे. म्हणजेच एका दिवसात प्रवासी संख्या जवळपास 6,000-6,200 पर्यंत पोहोचली आहे.