आ बच्चू कडू म्हणाले, देशात क्रांती होणार !

0

 

अमरावती (Amravati):आज लोकसभा निवडणुकीत मतदानातून देशात एक क्रांती घडेल असा दावा प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना केला आहे. गेल्या वीस वर्षांपासून आम्ही शेतकरी शेतमजुरांसाठी लढत आहोत.मला एकच अपेक्षा आहे मतदारांकडून की, ही लढाई आम्ही शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, कष्टकरी यांच्यासाठी लढत आहोत. तर त्यांनी ही निवडणूक आम्हाला जिंकून द्यावी. निश्चितच ही निवडणूक शेतकरी, शेतमजूर हे आम्हाला जिंकून दिल्याशिवाय राहणार नाहीत ,आजच्या मतदानामुळे या देशात एक क्रांती घडेल. जाती धर्माच्या नावावर नाही तर शेतकरी शेतमजुरांच्या नावावर ही निवडणूक आगळीवेगळी ठरेल असेही बच्चू कडू म्हणाले.