बीड– (BEED)संत भगवान बाबा यांच्या फिरत्या नारळी सप्ताहात (BJP)भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री सहा वर्षानंतर एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यामुळे बहिण भावातील संघर्षाची दरी कमी झाल्याची चर्चा होत आहे.
सत्ता संघर्षावरून अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मुंडे बहिण भावाचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पहिला आहे. मात्र याच संघर्षाला भगवान गडाच्या पायथ्याशी भारजवाडी गावात नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी पूर्णविराम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
याप्रसंगी(PANKAJA MUNDE) पंकजा मुंडे यांनी बोलताना माझा भाऊ मोठा झाला असेल तर मला आनंदच आहे. असे म्हणून या संघर्षाला पूर्णविराम देण्याची सुरुवात केली. यावेळी उपस्थित जनसमुदायाने टाळ्या वाजवून सादही दिली.
पंकजा मुंडे म्हणाल्या धनंजय नंतर चार वर्षांनी माझा जन्म झाला. त्याचं काहीतरी कारण असेल. आम्ही पराक्रमी आहोत. त्याचा पराक्रम माझा पराक्रम वेगळा त्याचा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा मात्र शक्ती सारखीच आहे.
दोघे एकाच पाठीवर जन्माला आलो आमचे भविष्य काही वेगळे असेल. त्यासाठी काही वेळ वाट पाहा असे संकेतही दिले.
पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर (DHANANJAY MUNDE)धनंजय मुंडे उभे राहिले. भारजवाडीला भारगजवाडी असा उल्लेख मी मुद्दामून केला असे म्हणत धनंजय मुंडे यांनी आमच्या दोघा बहिण भावाच्या नात्यांमधील काही गज का होईना अंतर या नारळी सप्ताहात कमी झाले अशी कबुली दिली.
आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या विचाराने काम करतो. विचारांमध्ये भलेही कोसवांतर असली तरी चालेल घरामधल्या संवादामध्ये तसूभर सुद्धा अंतर नसले पाहिजे. ते अंतर कमी झालं. मुंडे कुटुंबातील गडाच्या भक्ती संदर्भात कोणीही संशय निर्माण करण्याचे कारण नाही. असे म्हणत गडाच्या वादावर ही पूर्णविराम दिला.
मोठा भाऊ या नात्याने लहान बहिणेने जे भगवानगडासाठी करायला सांगितलं आहे. ते मी सर्व करेल असं म्हणत आमच्या विचाराच्या वाटण्या आहेत. आमचे एक सुईच्या टोका एवढेही वैर नाही. राजकीय विचाराच्या वाटण्या आहेत असे सांगितले.
दरम्यान,धनंजय मुंडे यांचे भाषण सुरू असताना सभेमधून एका व्यक्तीने तुम्ही दोघजण एकत्रित यावे अशी विनंती केली. उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी जे होतं ते बऱ्यासाठी होतं असे म्हणताना पंकजाताई दोन वेळेस आमदार राहिल्या त्या मंत्री झाल्या त्याच पद्धतीने मी आमदार झालो विरोधी पक्षनेता झालो आणि मंत्रीही झालो. जर असं झालं नसतं तर दोघांपैकी कोणीतरी एकच मंत्री झाला असता, असे तुम्ही समजून घ्या म्हणत धनंजय मुंडे यांनी आम्ही दोघे एकच आहोत असे संकेत दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता संघर्षात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून (MAHARASHTRA)महाराष्ट्राचे राजकारण (POLITICAL)ढवळून काढले होते. मात्र, भगवानगडाच्या पायथ्याशी हजारो भाविक भक्तांच्या समोर आज पंकजा आणि धनंजय मुंडे यांचे मनोमिलन झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे बहिण भाऊ एकत्रित येण्याचे संकेत नव्या राजकारणाची नांदी देणारेच ठरले.