14.50 लाखात सरपंचपद, कुठे घडला प्रकार वाचा…
शेलुद. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत (Grampanchayat Election) जोरदार चुरस पाहायला मिळते. टोकाची भांडणे होतात. त्याचबरोबर निवडून येण्यासाठी दोन्ही पॅनेलकडून जोरदार प्रयत्न केले जातात. पण, औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad) वेगळीच घटना घडली आहे. त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यात त्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील शेलुद ग्रामपंचायतील लिलाव झाल्याची गोष्ट उघडकीस आली आहे. पैश्यांची बोली लावून, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची पदे विकल्याचा प्रकार समोर आला आहे. 14.50 लाखात सरपंचपद तर 4 लाखात उपसरपंचपद विकले गेले. व्हीडीओमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. तर काहींनी उपसरपंचानेच ही भानसड चव्हाट्यावर आणल्याचेही सांगितले जात आहे. व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यामुळे आता काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील शेलुद गावात ग्रामपंचायतीचा लिलाव झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड आला आहे. पैश्यांची बोली लावून, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची पदे विकली आहेत. सरपंचपद 14 लाख 50 हजार, तर उपसरपंच पद 4 लाखात विकले, त्याचबरोबर सदस्य पदासाठी 70 हजारांपासून 2 लाखापर्यंत बोली लागली होती. शकुंतला योगेश ससेमहल असे साडे चौदा लाख रुपये देऊन सरपंच पदी निवडून आलेल्या महिलेचे नाव आहे. राजू म्हस्के असे 4 लाख रुपये भरून उपसरपंच झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मात्र लिलाव न पटल्यामुळे राजीनामा देऊन राजू म्हस्के या उपसरपंचांनी हा प्रकार उजेडात आणला असल्याचे बोलले जात आहे. गावाचे कारभारी लिलावातून निवडण्यात आल्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. यापूर्वीही असे प्रकार उघडकीस आले होते. वेळोवेळी कारवाईची भाषाही वापरली गेली होती. मात्र, पुढे काय झाले ते स्पष्ट होऊ शकले नाही.
ग्रामसभेत जाहीर लिलाव
गावाच्या मंदिरासमोर ग्रामसभा बोलवून ग्रामपंचायत पदांचा लिलाव केला होता. सरकार दरबारी मात्र ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्याचा केला बनाव रचण्यात आल्याचे उजेडात आले आहे. सरपंचपदी निवडून आलेल्या सरपंच पतीने मात्र लिलावाचा झाला नसल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे गावातील नागरिकांकडून लिलावाची जाहीर कबुली देण्यात आली आहे.