मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यावे – यशोमती ठाकूर

0

 

अमरावती- अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण गंभीर आहे. दुर्दैवाने आज सत्ताधारी लोकंच महाराष्ट्राचा बिहार करत आहेत.पोलिसांची भीती राहिलेली नाही. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे दिले पाहिजे अशी मागणी काँग्रेस आमदार ऍड यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
पुरोगामी महाराष्ट्राला डाग लावणाऱ्या या सत्ताधाऱ्याना जनता सोडणार नाही. सगळे गोळीबार करणारे म्हणतात आमचे बॉस सागर व वर्षा बंगल्यावर राहतात.नागपूरमध्येही क्राईम रेट वाढला, तर पुण्यात कोयता गॅंग वाढली असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.