नागपूर – बजरंग दलाने नागपूर दीक्षाभूमी ते अयोध्या अशा बाईक यात्रेचे आयोजन केले आहे. पण आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अणि वंचित बहुजन आघाडीने याचा तीव्र विरोध केला आहे. “बौद्ध धम्म विज्ञानवादी आणि देवाला न मानणारा धम्म आहे. त्यामुळे विचाराची भिन्नता असताना दीक्षाभूमीवरुन बजरंग दलाच्या अयोध्या बाईक यात्रेचा विरोध करतोय” असं वंचित बहुजन आघाडीचे नेते राहूल वानखेडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे दीक्षाभूमी येथून सुरू होणारी विश्व हिंदू परिषद बजरंगदलाची बाईक रॅलीच्या प्रारंभस्थळ बदलून दिले. आता अण्णाभाऊ साठे चौकातून बाईक यात्रा सुरू होईल. विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकऱ्यांनी बाईक यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी जय भीम, जय श्रीराम, जय शिवाजी असे नारे दिले.
Related posts:
आदिमांनी सामाजिक शक्ती उभी करावी- आदिम नेत्या ॲड. नंदा पराते
May 10, 2026Artical Blog
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त, १७ आणि १८ मे रोजी 'जलसंवाद' आणि 'ज...
May 10, 2026Artical Blog
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन व सर्वोत्कृष्ट परिचारिका/ट्यूटर पुरस्कार सोहळा २०२६
May 10, 2026Artical Blog














