ते वाघ होत नाहीत

0

मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

सातारा SATARA  – “बाळासाहेबांचे कपडे, बाळासाहेबांचे रुद्राक्ष घालून बाळासाहेब होता येत नाही…लांडग्यांनी वाघाचे कातडे घातले तरी ते वाघ होत नाहीत. वाघ एकच फक्त बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे,” या शब्दात  EKNATH SHINDE  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
सातारा येथे बोलताना शिंदे यांनी ठाकरेंच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. शिंदे म्हणाले, बाळासाहेबांचे ३७० कलम हटविण्याचे स्वप्न, राम मंदीर निर्मितीचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले. उद्धव ठाकरेंनी त्यांचे आभार मानले पाहिजे होते. त्यांना साष्टांग दंडवत घालायला पाहिजे होता. पण हे काँग्रेसला दंडवत घालत आहेत. बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले आहेत, म्हणून त्यांना नैतिक अधिकार नाही. ये पब्लिक है सब जानती है..येणाऱ्या निवडणुकीत बेईमानी, मिंधेपणाला उत्तर जनता देईल, असे शिंदे म्हणाले. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? बाळासाहेबांनी काँग्रेसला दूर ठेवले. भविष्यात माझी शिवसेना काँग्रेस होईल, त्यावेळी मी माझे दुकान बंद करीन, असे त्यांनी सांगितले होते. मिंधे कोण हे सर्व जनता जाणते, स्वार्थासाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले. महाराष्ट्राने भाजप आणि शिवसेना या युतीला निवडून दिले. त्यांच्या पाठीत खंजीर तुम्ही खुपसला. मग गद्दारी कोणी केली? असा सवालही शिंदेंनी केला.