राष्ट्रीय पत्रकारिता दिवस का साजरा केला जातो? National Press Day 2022: भारतातील स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारितेचे प्रतीक म्हणून दरवर्षी १६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो. याच दिवशी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाने (PCI) काम करण्यास सुरुवात केली. लोकशाहीमध्ये पत्रकारितेला महत्वाचे स्थान राहिले आहे.बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतुन वृतपत्रात लेखन करणारे आद्य पत्रकार तसेच मराठी पत्रकारीतेचे जनक आहेत.बाळशास्त्री जांभेकर यांचे टोपननाव आचार्य असे होते.बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी पोंभुरले महाराष्ट्र येथे झाला होता.बाळशास्त्री जांभेकर यांचा मृत्यू १८ मे १८४६ रोजी वयाच्या ३४ व्या वर्षी झाला होता.
पत्रकार दिन इतिहास –
मराठी भाषेमधले पहिले वृत्तपत्र म्हणुन ओळखले जाणारे दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनीच ६ जानेवारी १८३२ रोजी चालू केले होते.
दर्पण ह्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारीतेची पहिले मुहुर्तमेढ रोवली.
भाऊ महाजन यांच्या साहाय्याने बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले होते.ह्या वृत्तपत्राचा प्रथम अंक हा ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित केला गेला होता.
महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या पर्यंत आपले विचार,आपले मत आपल्या भावना पोहचवण्यासाठी बाळशास्त्री जांभेकर यांनी मातृभाषा मराठीतुन हे वृत्तपत्र सुरू केले होते.
१८३२ मध्ये सुरू करण्यात आलेले हे वृत्तपत्र १८४० पर्यंत चालवण्यात आले होते.इंग्रजी सत्ताधारींना स्थानिक लोकांच्या अडीअडचणी समस्या समजाव्या याकरीता दर्पण ह्या वृत्तपत्राचा एक अंक हा इंग्रजी भाषेत काढण्यात आला होता.
त्या काळात वृत्तपत्र ही संकल्पना पाहिजे तशी रूजलेली नव्हती म्हणून म्हणून दर्पण ह्या वृत्तपत्राला पाहिजे तसे वर्गणीदार प्राप्त झाले नाही.पण जसजशी ही संकल्पना रूजत गेली त्यामधील विचार रूजत गेले.तसतसा ह्या वृत्तपत्राला जनतेकडुन अधिक प्रतिसाद प्राप्त होत गेला.
सगळीकडे इंग्रजी वृत्तपत्राचा बोलबाला चालत असलेल्या ब्रिटिश काळात मराठी वृत्तपत्र सुरू करणे अणि त्यास मराठी वाचक प्राप्त करणे हे खुप अवघड होते तरी देखील बाळकृष्ण जांभेकर यांनी कुठलाही नफा प्राप्त होत नसताना प्रस़ंगी पदरमोड करुन दर्पण हे वृत्तपत्र आठ वर्षे चालवले.
पत्रकार कोण असतो? पत्रकारांचे महत्व काय आहे?
जगभरातील महत्वाच्या ताज्या बातम्या तसेच चालु घडामोडी लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम पत्रकार करत असतो.
पत्रकार हा एक असा एकमेव व्यक्ती असतो जो जनतेचे प्रश्न समाजासमोर निर्भिडपणे तसेच कुठलाही पक्षपात न करता मांडत असतो.
पत्रकार हा समाजाचे सर्वसामान्य जनतेचे ज्वलंत प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडत असतो.अणि सर्वसामान्य गरीब दीन जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत असतो.
म्हणुन पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असे देखील म्हटले जाते.
दर्पणमध्ये नेमकं काय असायचं ?
दर्पणचा पहिला अंक 6 जानेवारी 1832 रोजी प्रकाशित झाला होता. त्यावेळी हा अंक मराठी तसेच इंग्रजी अशा दोन्ही भाषेत म्हणजेच जोडभाषेत प्रकाशित केला जायचा. एक इंग्रजी आणि एक मराठी असे दोन स्तंभ या वृत्तपत्रात असत. मराठी जनतेला देशात काय सुरु आहे हे समजावे म्हणून स्तंभ मराठीत लिहिला जायचा. तर वृत्तपत्रात काय लिहिले आहे हे ब्रिटिशांना समजावे म्हणून दुसरा स्तंभ इंग्रजीत लिहला जायचा. इंग्रजी सत्तेचे कायम लक्ष असूनही तब्बल साडे आठ वर्षे दर्पण हे वृत्तपत्र चालले. त्याचा शेवटचा अंक जुलै 1840 मध्ये प्रकाशित झाला.
बाळशास्त्री जांभेकर बहुआयामी, बहुभाषिक आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्व
बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्राला पहिले वृत्तपत्र देऊन वैचारिक अभिसरणाची पेरणी केली. त्यांच्यानंतर वृत्तपत्र हे वैचारिक क्रांतीचे महत्त्वाचे साधन बनले. जांभेकर हे एक अतिशय हुशार आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांना संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषा चांगल्या अवगत होत्या. शिवाय ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, बंगाली आणि गुजराती या भाषांवरही त्यांचे प्रभुत्त्व होते. भूगोल, विज्ञान, गणित अशा विषयात ते पारंगत होते. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध प्रसिद्ध झालेले ते पहिले भारतीय आहेत. बाळशास्त्रींनी कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही काम पाहिले. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाल प्रणाम आणि सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.