लोकांच्या मनात भाजपबद्दल प्रचंड रोष – नाना पटोले

0

 

नागपूर- नुकत्याच झालेल्या निवडणूक पराभवाचे विश्लेषण काँग्रेस पक्षाने केलं आहे. भाजपपेक्षा काँग्रेसला 11 लाख मते जास्त मिळाली. आम्ही जनमत स्वीकारलं आहे. मात्र,लोकांच्या मनात भाजप विषयी मोठा रोष आहे असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केला.
इंडिया आघाडीबाबत काल ज्या बातम्या पेरल्या त्या पूर्णपणे खोट्या आहेत. बॅनर्जी नाराज नाहीत.
-भाजपने देश कसा विकला? संविधान कशा पद्धतीने संपविले जात आहे? लोकसभा तयारी या, अजेंड्यावर बैठक होणार आहे. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतो यावर आमचं लक्ष आहे.
ज्या घोषणा भाजपने केल्या त्याची अंमलबजावणी होते की, जुमलेबाजी होणार? हे पाहावं लागेल.
भाजप तीन राज्यात जिंकल्याने आता राज्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे काय हाल होतील? हे फेब्रुवारीत पाहायला मिळेल.आज पण त्यांचे हाल होतच आहेत असा टोला नाना पटोले यांनी लगावला.