राज ठाकरे आल्यामुळे महायुतीची शक्ती वाढेलच

0

नाशिक- नाशिकची 20 मे ला निवडणुक आहे त्यामुळे अजून वेळ आहे. पाच टप्प्यात निवडणुका आहेत त्यामुळे जागावाटप हळूहळू होत आहे.
राज ठाकरे एनडीएत येत आहेत याबद्दल आनंदच आहे, इंडिया मध्ये देखील कितीतरी पक्ष आहेत.राज ठाकरे आल्यामुळे महायुतीची शक्ती वाढेल कमी होणार नाही असा विश्वास अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. समोर विधानसभा आणि मनपाच्या पण निवडणुका आहेत. पहिली निवडणूक विदर्भात आहे, बाकी नंतर आहेत. कोणाची ताकत किती आहे हे मला माहिती नाही पण कोणाला तरी बरोबर घ्यायचे आहे तर जागा द्याव्या लागतील. मोदींना परत पंतप्रधान म्हणून पुन्हा बसवायचे आहे.

त्यामुळे वरून आदेश आले तर सगळे शांत होतील. 10 वर्षात हेमंत गोडसे यांनी काहीच केले नाही असे भाजप पदाधिकारी म्हणत असतील तर त्याबतबत नेतेच बघतील. प्रिया दत्त प्रवेश संदर्भात मला महिती नाही.
श्रीनिवास पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही.अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे कुटूंब आहे अस दिसत आहे.विरोध करा पण भाषा जपून वापरा,राजकारणात विरोधात असले तरी तुमच्यात रक्ताचं नात आहे.उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात देखील वाद झाले,मात्र त्यांच्यात काही अडचण आल्या तर ते एकमेकांसाठी धावून जातात असेही छगन भुजबळ म्हणाले.