आता वीज बिल माफ करून दाखवा-उद्धव ठाकरे यांचे आव्हान

0

चिखली


आमचे सरकार असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज बीलमाफीवरून आम्हाला घेरले होते. त्यांच्या त्या विधानाचा व्हिडीओ रेकॉर्ड लावून आता त्यांनी वीजबील माफ करून दाखवावे, असे आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मराठी मातीमधील गद्दारी गाडायची असेल, तर जिजाऊंच्या जन्मभूमीतून आशीर्वाद घेण्याचा निर्णय दसरा मेळाव्यात घेतला होता. काही जण ४0 रेडे घेऊन गुवाहटीला गेले आहेत. सत्ता वाचविण्यासाठी दर्शन करत आहेत. गद्दारांना बाळासाहेबांचे नाव पाहिजे आणि आशीर्वाद पंतप्रधान मोदींचा पाहिजे. या गद्दार आमदार, खासदारांनी भाजपच्या तिकिटावर निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला शनिवारी दिले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शेतकरी संवाद यात्रेची विदर्भातील पहिलीच जाहीर सभा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात शनिवारी सायंकाळी झाली. यावेळी त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर हल्लाबोल चढवला.

या ठिकाणी आम्हाला आनंद होत आहे. त्या ठिकाणी मध्यप्रदेशने वीज बिल माफ केले. या ठिकाणी त्या ठिकाणी करता ना… आता आव्हान आहे. तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि मी या ठिकाणी आहे. आता वीज बिल माफ करून दाखवा. आता होऊनच जाऊ द्या या ठिकाणी आणि त्या ठिकाणी. आम्ही कर्जमाफी केली होती. तुम्ही कर्जमाफी केली. कुणी किती केली त्यावर बोलायला या मैदानात. मी चर्चेला तयार आहे. फक्त पश्चिम विदर्भात थोडी बाकी होती”, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं.

“आपल्या छत्रपतींचा आपमान सुरू आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातच्या निवडणुकीसाटी गुजरातमध्ये वळले. का नेताय? तर गुजरातच्या निवडणुका जिंकायच्या . कालपरवा बोम्मई बोंबललेत . त्यांनी सोलापूरवर हक्क सांगितला. अक्कलकोटवर हक्क सांगितला. पुढच्या वर्षी कर्नाटकाच्या निडणुका आहे. मला भीती वाटते महाराष्ट्रात येणारे उद्योग त्यांनी गुजरातला नेले तसेच महाराष्ट्रातील हे तुकडे करायला मागे पुढे पाहणार नाही. का तर कर्नाटकाच्या निवडणुका आहे”, असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

“मिंदे मुख्यमंत्री शेपूट हात घालून सांगितली. अरे जाऊ द्या ना ४० गावे द्यायची आहेत ना. देऊन टाकू. पंतप्रधान बोलले उद्या पाक व्याप्त काश्मीर घेतल्यावर १०० गावे महाराष्ट्राला देतो. बसा बोंबलत”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

“महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. इकडचे उद्योग न्यायचे म्हणजे महाराष्ट्र कंगाल करायचा. इथे बेकारी वाढेल. तरुणांना बेकार ठेवायचं. छत्रपतींचा अवमान करून आदर्श तुडवायचे. आपल्या पंढरपुरचा विठोबा कर्नाटकात जाणार?”, असा सवाल त्यांनी केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर आहेत. बुलढाणा येथे त्यांच्या शेतकऱ्यांसोबतचा संवाद आयोजित करण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे यांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला.

या मेळाव्याला हजारो शेतकरी आणि शिवसैनिकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा हा शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

उद्धव ठाकरे आणखी काय-काय म्हणाले?

काही लोक ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले. त्यांच्याच मंत्र्याने म्हटलं आमचे ४० रेडे तिकडे गेले आहे. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी एकविरा देवीचे दर्शन घेतले. नंतर अयोध्येला गेलो होतो. हे गेल्या आठवड्यात हात दाखवायला गेले होते. ज्याचं भविष्य त्याला माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार. तुमचं भविष्य सर्वांना माहीत आहे. यांचे मायबाप दिल्लीत आहेत. तुमचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत. हिंदुत्व वाचवण्यासाठी शिवसेना सोडून गेल्याचं ते म्हणातात.

तुम्हाला पाहिल्यानंतर अन्याय जाळायला निघालेल्या या मशाली आहेत असं दिसतं. आपलं सरकार चांगलं चाललं होतं. यांनी आपलं सरकार पाडलं.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा