“प्रेयसीच्या हत्येनंतर प्रियकराने..”

0

खळबळजनक घटना

(New Dellhi)नवी मुंबई : मुंबईत खळबळ माजविणारी घटना घडली आहे. प्रेयसीची हत्या करुन प्रियकरानेही आत्महत्या केल्याची नवी मुंबईत कळंबोलीमध्ये घडली. प्रियकरानं आधी प्रेयसीचा गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः रेल्वेखाली उडी घेत आयुष्य संपविले.

प्रेयसीचा मृतदेह तब्बल महिनाभरानंतर पोलिसांच्या हाती लागला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी बाबर (वय १९ वर्ष) आणि वैभव बुरुंगले (वय २४ वर्ष) या दोघांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण कालांतरानं दोघांमध्येही खटके उडू लागले. भांडणे वाढली आणि वाद-विवाद रोजचेच झाले आणि अशातच वैभवच्या मनात संशयाचे भूत शिरले. त्यातून त्याने वैष्णवीच्या हत्येचा कट रचला. वैष्णवीची हत्या कशी करणार? कुठे करणार? कशी करणार? या सर्व बाबी वैभवने आधीच आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवल्या होत्या.

त्याप्रमाणे वैभव वैष्णवीला खारघर हिलवर घेऊन गेला. खारघर हिलवर नेल्यानंतर वैभवने तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर खारघर हिलवरुन तो परतला आणि जवळच्या जुईनगर रेल्वे स्थानकावर रेल्वेगाडीखाली येऊन त्याने आत्महत्या केली. वैभवच्या आत्महत्येचा तपास करताना पोलिसांना त्याचा मोबाईल सापडला. मोबाईलमध्ये त्याने वैष्णवीची हत्या केल्याचे टाईप करुन ठेवले होते. त्यात एक सांकेतिक क्रमांक देखील होता. या सांकेतिक क्रमांकाचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. बरेच दिवस तपास चालल्यावर तो सांकेतिक क्रमांक खारघर हिलवरील एका झाडाचा असल्याचे निष्पन्न झाले व त्यातून मृतदेहाचाही छडा लागला.