अकरा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान

0

मुंबई(MUMBAI), 7 मे : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ७ मे रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे …

लातूर – ५५.३८ टक्के

सांगली – ५२.५६ टक्के

बारामती – ४५.६८ टक्के

हातकणंगले – ६२.१८ टक्के

कोल्हापूर – ६३.७१ टक्के

माढा – ५०.०० टक्के

उस्मानाबाद – ५२.७८ टक्के

रायगड – ५०.३१ टक्के

रत्नागिरीसिंधुदूर्ग – ५३.७५ टक्के

सातारा – ५४.११ टक्के

सोलापूर – ४९.१७ टक्के