इर्शाळवाडीतील मृतांची संख्या तीन आकडी राहण्याची भीती-गिरीश महाजन

0

(Jalgaon)जळगाव : (Irshalwadi in Raigad)रायगडमधील इर्शाळवाडी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या २६ पर्यंत पोहोचली असतानाच (Rural Development Minister Girish Mahajan)ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मृतांची संख्या तीन आकडी असू शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. या अपघाताच्या माहितीनंतर सुरुवातीपासून महाजन हे घटनास्थळावर हजर असून सरकारच्या वतीने बचाव मोहिमेचे नेतृत्व करीत आहेत. तेथून परतल्यावर (Bahinabai Chaudhary of Jalgaon in North Maharashtra University)जळगावच्या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही भीती व्यक्त केली.

महाजन यांनी सांगितले की, या दुर्घटनेची माहिती कळल्यावर आम्ही पहाटे घटनास्थळाकडे रवाना झालो. वादळी पाऊस बरसत होता. या हवामानाच्या स्थितीमुळं बचावकार्यात बरेच अडथळे येत होते. सुरुवातीला आम्ही काही जणांना वाचवलं. मात्र, मृतांची संख्या तीन आकडी असू शकते. इर्शाळवाडीत अडीचशे कुटुंब राहत असल्याची माहिती आहे. यापैकी सुमारे दिडशे लोकांना आत्तापर्यंत बाहेर काढण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.