मविआमध्ये फूट पाडण्याचे काम सरकार करत आहे – पृथ्वीराज चव्हाण

0

नागपूर🙁Nagpur)महाविकास आघाडी मध्ये भगदाड पाडण्याचे काम केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार करीत आहे.विरोधकांमष्ये एकमत नाही हे दाखवण्याचे काम शिंदे- फडणवीस सरकार करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthwiraj Chauhan)यांनी केला. मविआच्या वज्रमुठ सभेच्या निमित्ताने आले असता ते बोलत होते. अजितदादा पवार-अमित शहा (Amit Shah)भेटले का, याबाबतीत स्पष्टता व्हावी, संभ्रम नको, केवळ तर्कवितर्क लावण्याला अर्थ नाही असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याचे काम केंद्र आणि राज्यातील सरकार करीत आहे. पण त्याला यश येईल असं वाटत नाही. कारण महाराष्ट्राची जनता सर्व जाणते.
काँग्रेसने आपली भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे. सैनिकांचे मनोबल खचेल असे प्रश्न विचारू नये यावर त्यांनी भर दिला. देशात मोदी सरकारविरोधात  वातावरण असल्याने खोट्या बातम्या, वावड्या उठविल्या जात असल्याचे चव्हाण म्हणाले.