दिवसाढवळ्या हत्या होणे ही गंभीर बाब – खा संजय राऊत

0

 

नागपूर: (Nagpur)दिवसाढवळ्या हत्या होणे ही गंभीर बाब आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर, अतिकच्या हत्येनं योगी (Yogi Adityanath) सरकारचा क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचा आरोप शिवसेना नेते खा संजय राऊत (Sanjay Raut)यांनी माध्यमांशी बोलताना केला.

उत्तर प्रदेश (UP) सरकारने कलम १४४ लावली आहे, तिथले सरकार सक्षम आहे. पोलिस चकमकीच्या घटना मी समजु शकतो. मात्र, पोलिसांच्या बंदोबस्तात दिवसा ढवळ्या हत्या होणे, ही निश्चितच गंभीर बाब आहे. पोलिसांच्या घेऱ्यात हे होते ही दुर्दैवी आहे. पोलिसाच्या एन्काउन्टर विषयी आम्ही कधी प्रश्न चिन्ह निर्माण केले नाही. आज नागपुरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा एतिहासिक होणार असल्याचा दावा केला.