
नागपूर NAGPUR – स्त्रीशक्ती संवाद यात्रेच्या निमित्ताने रश्मी ठाकरे महिला शक्ती एकवटणार आहेत. यासाठी आज मंगळवारी माजी महापौर किशोरी पेडणेकर Kishori Pednekar इतर पदाधिकाऱ्यांसह विदर्भात आहेत. विमानतळावर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. महिलांचा जोश पाहून तुम्हाला यात्रेची तयारी दिसलीच असेल, स्त्री संवाद यात्रा महाराष्ट्रात काढण्यात येत आहे. महाराष्ट्रात भूतकाळातले प्रश्न काढले जात आहेत. वर्तमान काय आहे?
या वर्तमानाला शोधायला, भविष्याला घडवायला, हा स्त्री शक्तीचा संवाद आहे. महायुतीत जागावाटप करणारे आमचे पक्षप्रमुख आहेत.त्यांचा फॉम्युला ठरेल तेव्हा तो समोर येणारचं आहे.जागावाटप पेक्षा जे जागेवर आहे, त्यांना कशी चालना द्यायची, जे निष्ठेने थांबले त्यांच्या सोबत संवाद करून वर्तमानातील काही प्रश्न आहेत, यावर विचार करायचा आहे.भूतकाळ हवाचं. मात्र, वर्तमानही मजबूत हवा, आम्हाला कोणाला जागा दाखवायची गरज नाही.
जागा जनताच दाखवणार, आम्ही फक्त आमच्या बरोबर असलेल्यांना त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे, त्या एनर्जीला पॉवर देण्याच काम करतो आहे.चांदा ते बांदा म्हंटलं जातं तसं देशाचे मध्यस्थान नागपूर आहे. म्हणून आम्ही नागपूरची निवड केली. इथून आम्ही मुंबईपर्यंत पोहोचू, सगळ्या लोकसभेमध्ये आणि विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही जाणार आहोत.निकाल काय लागला? यासंदर्भात बोलताना त्यांच्या स्क्रिप्ट ठरल्या आहेत. मात्र, एक स्क्रिप्ट जनतेमध्ये आहे. हे त्यांनी विसरू नये.
असे पेडणेकर म्हणाल्या.