अमरावती : शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांच्या भेटीकरीता कॉंग्रेस नेते राहूल गांधी मातोश्रीवर येणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. उध्दव ठाकरे यांच्यामाध्यमातून संजीवनी मिळेल अशी राहुल गांधी यांना अपेक्षा आहे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेनंतर जो फरक सामान्य माणसांवर पडला पाहिजे होता तर तो फरक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर देखील पडला नाही. राहूल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा त्यांच्या कार्यकर्त्यांवरच परीणाम पडला नाही तर जनतेवर कसा पडणार? असा सवाल उपस्थित करीत शिवसेनेमुळे कॉंग्रेसला नव संजीवनी मिळत असेल तर ही चांगली गोष्ट असल्याचेही यावेळी कडू म्हणाले.
Related posts:
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त, १७ आणि १८ मे रोजी 'जलसंवाद' आणि 'ज...
May 10, 2026Artical Blog
मुल मालधक्का प्रकल्पाला ब्रेक; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
May 10, 2026Artical Blog
स्व. भाऊसाहेब चांद्रायण स्मृती गौरव पुरस्कार नितीन गडकरी यांना
May 9, 2026Artical Blog














