
आयझोल-बांधकाम सुरु असलेला रेल्वेपूल कोसळून १७कामगारांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटनामि झोराममध्ये बुधवारी घडली. (Mizoram Rail Bridge collapse) मिझोरमची राजधानी आयझोल पासून २१ किमी अंतरावर असलेल्या सायरंगमध्ये सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून घटनास्थळी बचाव पथके रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.
ही घटना घडली त्यावेळी पुलावर ३० ते ३५ मजुर कामावर होते. बैराबी ते सायरंग या शहरांना जोडणाऱ्या कुरुंग नदीवर हा पूल उभारला जात होता. तिसऱ्या आणि चौथ्या खांबामधील साडेतीनशे फुटाचा गर्डर पडल्याने हा अपघात झाला.पुलामध्ये एकूण ४ खांब आहेत. या गर्डरवर हे सर्व मजूर काम करत होते. जमिनीपासून पुलाची उंची 104 मीटर म्हणजेच 341 फूट आहे. त्यामुळे गर्डरसोबत मजुरही उंचीवरून खाली पडले. या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
जंगलात तेंदूपत्ता तोडताना दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला, परिसरात दहशतीचे वातावरण
May 22, 2026Artical Blog
















