आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपचा केवळ गोंधळ -आ रोहित पवार

0

 

(Bid)बीड– आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपा केवळ गोंधळ निर्माण करून दोन समाजात भांडणे लावायचे काम करत आहे. टिकणारे आरक्षण जर हवे असेल तर ते केंद्रातूनच घ्यावे लागेल.

सत्तेत असलेले (Prime Minister Narendra Modi)पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन वेळेस महाराष्ट्रात येऊन गेले परंतु या प्रश्नावर ते बोलले नाहीत असा आरोप  (Rohit Pawar of NCP)राष्ट्रवादी काँग्रेसचे आ रोहित पवार यांनी केला. राज्यातील (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्ली दरबारी जाऊन आरक्षणाचा प्रश्न मांडावा, घटनात्मक दुरुस्ती करून 50 टक्केच्या पुढे टिकणारे आरक्षण मंजूर करून घ्यावे तरच मराठा समाजासह धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकेल यावर रोहित पवार यांनी भर दिला.