महाराष्ट्रात जे प्रदूषण वाढले त्याचे जनक एकनाथ शिंदेच – संजय राऊत

0

मुंबई MUMBAI  -महाराष्ट्रात राजकारणात प्रदूषण वाढले त्याचे जनक EKNATH SHINDE एकनाथ शिंदे हेच आहेत असा आरोप शिवसेनेचे नेते खा संजय राऊत  SANJAY RAUT यांनी केला आहे. नागपुरातील खासदार महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात वक्तव्य करून ठाकरे गटाला लक्ष्य केले होते. संजय राऊत म्हणाले, दादा भुसे सत्तेचा गैर व्यवहार करत आहेत दादा भुसे यांच्यासह सर्व मंत्री भ्रष्ट असून या सरकारचा पाया आणि कळस भ्रष्ट आहे. खोके मोजून हे सरकार आले आहे .कागदपत्रे आहेत, समोर आणेल. शेवटी न्यायालयाचा आदर करावाच लागतो ,काही न्याय मान्य नसेल तरीही भगवा शेला ही आमची ओळख
युद्धाला जायला प्रेरणा मिळते त्याचा रंग बदलला नाही आणि पक्ष बदलला नाही ,विकलो गेलो नाही

आज एकनाथ शिंदे आणि अजित पवार बोलतायत ती भाजपची स्क्रिप्ट आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना खोटे ठरविण्यासाठी भाजपचा प्रयत्न असून चारित्र्य हनन करत आहे भाजपने पक्ष आणि घर फोडले,आता नेते तुटत नाही म्हणून चारित्र्यावर हल्ला केला जातोय अजित पवार आणि मिंधे गटाने त्यांचा मार्ग निवडला त्यांनी तसेच पुढे जावे, अजितदादा नाही बोलत तर भाजप बोलत आहे. भविष्यात महाराष्ट्र आणि देशात आमचे सरकार येईल असा दावा केला. शरद पवार यांनी सांगितले होते भाजपात जा तर मग परत का आलात ? राजकारण आम्हाला पण कळतं, पवार साहेब गेले का कुठे, पवार साहेब पुरोगामी महाराष्ट्राचे नेते आहेत. मनोज जरांगे त्यांच्या समाजासाठी ते काम करत आहे.जरांगे सरकारला धोकादायक वाटतात याकडे लक्ष वेधले.