-तर काय होईल मला माहीत नाही – उद्धव ठाकरे

0

 

जालना JALNA- शांततेच्या मार्गाने आंदोलकांवर लाठीमार, हवेत गोळीबार करण्यात आला हे असं सरकार मी कधी पाहिलं नाही, यापुढे आंदोलकांवर बळजोरी झाल्यास काय होईल मला माहित नाही या शब्दात राज्य सरकारला SHIVSENA  शिवसेना नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray  यांनी इशारा दिला आहे.
जालना येथे आंदोलकांशी,जखमींशी भेटल्यानंतर ते बोलत होते. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी उद्धव ठाकरे यांनी मागणी केली.
यापूढे आंदोलकांवर जोर जबरदस्ती केली तर काय होईल मला माहित नाही, असा ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला.