नुकसानग्रस्त शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांना विनंती

0
नुकसानग्रस्त शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांना विनंती
loss-affected-farmers-request-to-the-chief-minister

 

भंडारा (Bhandara) :- जिल्ह्यात १९ ते २९ जुलै या कालावधीत अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामांतर्गत लागवड केलेल्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धान पिकाची शेती पुर्णतः पाण्याखाली बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात युतीचे सरकार असून शिंदे – फडणवीस – पवार या सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जनहिताच्या मोठमोठ्या योजनांचा पाऊस पाडला. या योजनेतंर्गच सरकारला बहिणी लाडकी झाली, भाऊ लाडका झाला पण अतिवृष्टीमुळे गलीतगात्र झाला तो शेतकरी राजा. या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देते वेळेस, नाथा परक करू नको रे , अशी विनवणी मुख्यमंत्र्यांना लाखांदूर तालुक्यातील किरमटीच्या जयपाल भांडारकर या शेतकऱ्याने केली आहे.

दरम्यान, भंडारा जिल्ह्यात २७ जुलैच्या मध्यरात्री व २८ जुलै रोजी दिवसा १२ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस बरसल्याने (Heavy Rain) जनजीवन प्रभावित झाले. जिल्ह्यात सातही तालुके मिळून ९९ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली होती. यात अतिवृष्टीमुळे २३ हजार २६० हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत. यात एकूण ५१९ गावांमधील शेतशिवाराचा समावेश असून त्यात ४९ हजार १९७ शेतकरी बाधित झाले आहेत. खरीप हंगामांतर्गत शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन, तूर, कापूस व भाजीपाल्याचे लागवड केली होती. मात्र, १९ ते २९ जुलै या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामांतर्गत लागवड केलेल्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आदेशानंतर महसूल प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण केले. यात भंडारा तालुक्यातील १२२, मोहाडी १०८, तुमसर ६, पवनी १२८, साकोली ४६, लाखनी २०, तर लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांचे सर्वेक्षण झाले आहे. यामध्ये एकंदरीत ९९ हजार ९९६हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. त्यापैकी २३,२६० हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे. भंडारा तालुक्यात २६१९, मोहाडी ४१८१, तुमसर २७,५१७, साकोली ५०४, लाखनी १३१ तर लाखांदूर तालुक्यात सर्वाधिक १५,६१० शेतकऱ्यांच्या समावेश आहे.

अचानक आलेल्या अतिदृष्टीच्या पावसामुळे संपूर्ण भात शेती ही पाण्याखाली गेली आहे. संपूर्ण लाखांदूर तालुक्यातील शेतकरीऱ्यांनी भात शेतीवर (Farmer suicide) कर्ज घेऊन शेतात भात पिकाची लागवड केली आणि पाण्यामुळे संपूर्ण शंभर टक्के पीक नुकसान झाले असून शेतकऱ्याला एका एकरामागे पन्नास हजार रुपयाची मदत आणि शेतावरील पीक कर्ज माफ करा नाहीतर मुख्यमंत्रीसाहेब शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय कुठलाही पर्याय राहिला नाही. ज्या पद्धतीने तुम्हाला बहिणी लाडकी झाली आणि भाऊ लाडका झाला, त्या पद्धतीने मात्र शेतकऱ्याला परका करू नका आणि शक्यतो लवकर आम्हा शेतकऱ्याला नुकसान भरपाई आणि कर्जमाफीचा लाभ द्या ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे (Chief Minister Eknathji Shinde) यांना माझी विनंती आहे

Farmer suicide in Maharashtra
Farmer suicide in India 2024
Farmer suicide in india
Farmers suiciding in India PDF
Farmer suicides in India 2023
Farmer suicide essay
Farmer suicide rate in India
Farmer suicide rates 2023