जालना- 30 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर आहेत. बीड पोलिसांनी आतापर्यंत तब्बल साडेचार हजार जणांची चौकशी केली असून चौकशीत पाचशेहून अधिक आरोपी आहेत. या प्रकरणात मराठा समन्वयकांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेऊन विनंती पत्र दिले आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध पथके स्थापन केली. या पथकांनी आतापर्यंत 171 आरोपींना अटक केली आहे. पोलीस निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप मराठा समन्वयकांच्या शिष्टमंडळाने केला. पोलिसांनी देखील आम्ही निरपराध तरुणांवर कारवाई करत नाहीत असे स्पष्टीकरण दिले आहे. यातील मास्टरमाईड लवकरच सापडेल त्यासाठी दोन पथके मागावर असल्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.
Related posts:
आदिमांनी सामाजिक शक्ती उभी करावी- आदिम नेत्या ॲड. नंदा पराते
May 10, 2026Artical Blog
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त, १७ आणि १८ मे रोजी 'जलसंवाद' आणि 'ज...
May 10, 2026Artical Blog
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन व सर्वोत्कृष्ट परिचारिका/ट्यूटर पुरस्कार सोहळा २०२६
May 10, 2026Artical Blog














