
जालना- 30 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर आहेत. बीड पोलिसांनी आतापर्यंत तब्बल साडेचार हजार जणांची चौकशी केली असून चौकशीत पाचशेहून अधिक आरोपी आहेत. या प्रकरणात मराठा समन्वयकांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेऊन विनंती पत्र दिले आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध पथके स्थापन केली. या पथकांनी आतापर्यंत 171 आरोपींना अटक केली आहे. पोलीस निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप मराठा समन्वयकांच्या शिष्टमंडळाने केला. पोलिसांनी देखील आम्ही निरपराध तरुणांवर कारवाई करत नाहीत असे स्पष्टीकरण दिले आहे. यातील मास्टरमाईड लवकरच सापडेल त्यासाठी दोन पथके मागावर असल्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















