
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेत दोन तास 13 मिनिटे भाषण केले. त्यात शेवटी फक्त ते दोन मिनिटे मणिपूरवर बोलले. मणिपूर अनेक महिन्यांपासून जळत आहे तर दुसरीकडे पंतप्रधान संसदेत हसून बोलत होते. विनोद करत होते. हे पंतप्रदानांना शोभत नसल्याची टीका राहुल गांधींनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
जर देशात हिंसाचार होत असेल तर भारताचे पंतप्रधान त्याची खिल्ली उडवू शकत नाहीत. विषय काँग्रेस किंवा मी नव्हतो तर विषय मणिपूर होता. मणिपूरमध्ये काय होत आहे, आणि त्याला लगेच का थांबवले जात नाही, हा विषय आहे, असे राहुल म्हणाले.
गेल्या 19 वर्षांच्या अनुभवात मी मणिपूरमध्ये जे पाहिले आणि ऐकले तसे कधीही पाहिले ऐकले नव्हते. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली आहे, हे मी विनाकारण बोललो नव्हतो, ते पोकळ शब्द नव्हते, असेही राहुल गांधी म्हणाले.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















