नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेत दोन तास 13 मिनिटे भाषण केले. त्यात शेवटी फक्त ते दोन मिनिटे मणिपूरवर बोलले. मणिपूर अनेक महिन्यांपासून जळत आहे तर दुसरीकडे पंतप्रधान संसदेत हसून बोलत होते. विनोद करत होते. हे पंतप्रदानांना शोभत नसल्याची टीका राहुल गांधींनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
जर देशात हिंसाचार होत असेल तर भारताचे पंतप्रधान त्याची खिल्ली उडवू शकत नाहीत. विषय काँग्रेस किंवा मी नव्हतो तर विषय मणिपूर होता. मणिपूरमध्ये काय होत आहे, आणि त्याला लगेच का थांबवले जात नाही, हा विषय आहे, असे राहुल म्हणाले.
गेल्या 19 वर्षांच्या अनुभवात मी मणिपूरमध्ये जे पाहिले आणि ऐकले तसे कधीही पाहिले ऐकले नव्हते. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली आहे, हे मी विनाकारण बोललो नव्हतो, ते पोकळ शब्द नव्हते, असेही राहुल गांधी म्हणाले.
Related posts:
आदिमांनी सामाजिक शक्ती उभी करावी- आदिम नेत्या ॲड. नंदा पराते
May 10, 2026Artical Blog
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त, १७ आणि १८ मे रोजी 'जलसंवाद' आणि 'ज...
May 10, 2026Artical Blog
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन व सर्वोत्कृष्ट परिचारिका/ट्यूटर पुरस्कार सोहळा २०२६
May 10, 2026Artical Blog














